फराज खान पठाण। महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रेमयुगुलाने एकाच झाडाला आणि एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रेटिस मलफोर्ड म्हणतात की, "प्रेम जरी दिसत नसेल तरी हवा आणि पाण्याइतकेच ते खरे आहे.हा एक खराखुरा सतत कार्यरत असलेला असा आवेग आहे. सागरातील लाटा आणि प्रवाहांप्रमाणे तो सतत खळाळता असतो" मात्र आज विजयादशमीच्या सुर्य प्रकाश उजडण्या आधीच दोन प्रेम युगुलने 'एकाच झाडाला,एकाच दोरीने गळफास लावून कायमाचा जगाचा निरोप घेतल्याची धकादायक घटना जिल्ह्यातील महागांव जवळील अंबोडा येथे उघडकीस आली.
अंकुश भालेराव आणि रूबना(बदलेला नाव) असे आत्महत्या केलेल्या दोघांचे नाव आहेत. रूबना चा विवाह येत्या २८ ऑक्टोबर रोजी होणार होतं.दरम्यान घरात लग्नाची तयारी सुरू असताना रूबना ने प्रियकर अंकुश सोबत जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आणि रविवारी पहाटे दोघांनी एकाच वेळी गळफास लावून आत्महत्या केली. "प्यार हमारा अमर रहेंगा" असे म्हणत दोघांनी रविवारी च्या पहाटे दरम्यान एकाच दोरीने कडू लिंबाचा झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.दोन्ही राहणार अंबोडा येथील आहे.विशेष म्हणजे मुलीचे येत्या २८ ऑक्टोबर रोजी लग्न होणार होते.मात्र मुलीला लग्न मान्य नव्हतं त्यामुळे मुलाने आणि मुलीने गळफास लावून जगाचा निरोप घेतला.

