चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ताने आज सकाळी एकापाठोपाठ तब्बल आठ ट्विटस करित भारतावर गंभीर आरोप केले आहेत. लिजीयन झाओ यांनी काही वेळापूर्वी गलवान खोऱ्या वरून सोशल मीडियावर पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली आहे. त्यावरून गलवान खोऱ्या वरून भारत-चीन संघर्ष चिघळणार? असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या ट्विटर वरून लक्षात येते आहेत.
भारताने तिन्ही लष्काराच्या जवानांना लद्दाखा मध्ये गस्त वाढवण्यास सांगितल्या नंतर मंगळवार पासून तिन्ही सेना तळ ठोकून त्या ठिकाणी बसले आहेत. भारत आक्रमक झाल्याचे पाहून चीनचे परराष्ट्र मंत्रालयातील व्यक्ते लिजियन झाओ यांनी आज सकाळ पासून ट्विटर वर आठ ट्विटस केले असून त्या मध्ये गलवान हा चीनचा च भाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहेत.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhCH51IjAf8KPl7RkaW2Pe35T-7BbFhj-OWBqSYCl7V469_ZoYXJyCw0oB4ECyIctV3W6z3Tvep0n798CO34xZuqT1GpKtYP7BqJP_ZL6gBpKR08BvrotC9kT3wuUEhnMX0Qj9_SFf-5sCB/s640/chin+twittr.jpg) |
लिजियन झाओ यांनी केलेला ट्विट
|
पश्चिम क्षेत्रांमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हद्दीमध्ये गलावन खोरे आहे, असा झाओ लिजियन यांनी दावा केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून चिनी सैनिकांच्या तुकड्या तिथे तैनात असून ते या भागांमध्ये पेट्रोलिंग करतात असून ते या भागामध्ये पेट्रोलिंग करतात असं चीन च्या परराष्ट्र मंत्र्याच्या व्यक्तांचे म्हणणं आहे
चीन चा गलवान खोऱ्या वरील दावा भारताने आधीच फेटाळून लावला आहे. तरीही चीनकडून सातत्याने गलवान खोरे आमचेच असल्याचा दावा केल्या जात आहे. यासंबंधी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी सकाळी दरम्यान एकापाठोपाठ आठ ट्विटस केले. या ट्विट मध्ये त्यांनी गलवान खोऱ्याचा भाग हा चीनचा कसा आहे? हे सांगताना सोमवारी झालेल्या घटनेतील रक्तरंजित संघर्षासाठी भारताला जबाबदार धरले आहे. विशेष म्हणजे भारतानेच चीनच्या हद्दीत घुसखोरी केली असा त्यांचा आरोप चीनने केले आहेत. गलावान खोऱ्यामध्ये भारताकडून सुरू असलेली रस्ते उभारणी हेच चीनचे मूळ दुखणे असल्याचेही त्यांच्या सर्व ट्विटस मधून स्पष्ट होत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response