चालणारी गाडी थांबली अथवा गाडी मधील इंधन संपलं म्हणजे गाडी फेकायची नसते तसेच ब्रेकअपमुळे निराश होऊन संपुर्ण आयुष्य खराबा झाला असा विचार करणे म्हणजे स्वतःला नकारात्मक च्या खाईत लोटण्या सारखे आहे.
सर्वात आधी स्वतःकडे प्रकर्षाने लक्ष देणं सुरू करा.ब्रेकअप झाल्यानंतर अनेक जण आपल्या दिसण्यापासून खाण्यापियाच्या आवडीनिवडी वर लक्ष देणं बंद करतात.त्यामुळे ती व्यक्ती अधिक निराश होता.त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा,कायम ग्रुप मध्ये रहा जेणे करून तुम्ही पुढील आयुष्य आनंदात आणि नव्याने आयुष्य जगाल
ब्रेकअप किंवा घटस्फोटचे कारण काही ही असो मात्र आयुष्यातून त्या माणसाचं निघून जाणं ज्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम करताय,हे मन दुखावणार असतं.त्यामुळे ब्रेकअप किंवा घटस्फोट अशा गोष्टी माणसाला खूप वाईटरित्या मनातून खचवतात.अशा परिस्थितून गेलेली लोक असे वागतात की,आता त्यांच्या कडे जगण्यासाठी अजून काहीच उरलं नाही.त्यांच्या डोक्यात सतत नकारात्मक विचार सुरू राहत असल्याने ते नेहमी डिप्रेशन मध्ये राहतात.
