आर्णी बायपास जवळील घटना
आर्णी - नागपुर-तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावरील आर्णी जवळ चारचाकी आणि दुचाकी मध्ये समोरा समोर धडक झाल्याने यात तीन जण जागीच ठार झाल्याची घटना आर्णी येथील बायपास वर घडली.
दुचाकी वर तीन जण बसून आर्णी वरून यवतमाळ कडे राॅग साईड फोअरवे वरून जात असताना इंडीको ला जबरदस्त धडक दिल्याने यात दुचाकी वरील तिघेही जागीच ठार झाले. दिपक मेश्राम, नथ्थू कुंबरे आणि संदिप आत्राम असे अपघातात जागीच ठार झालेल्या युवकांचे नाव आहेत.
