गुरूवारी कोरोनाने घेतले सात बळी

गुरूवारी कोरोनाने घेतले सात बळी
यवतमाळ : जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवशी १००७ जण कोरोनामुक्त झाले होते तर आज (दि. १८ मार्च) ६९५ जणांनी कोरोनावर मात केली. गत दोन दिवसात बरे झालेल्या जवळपास १७०२ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. गुरुवारी जिल्ह्यात आढळलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांपेक्षा बरे होणा-यांची संख्या दुपटीपेक्षा जास्त आहे. तर जिल्ह्यात गत दिवसभरात सात जणांचा मृत्यु झाला असून ३२५ जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. 


यामध्ये यवतमाळ १०५, पुसद ५४, दिग्रस ३८, उमरखेड ३७, आर्णी १४, पांढरकवडा १३, नेर १२, राळेगाव १२, घाटंजी ११, वणी ११, महागाव ८, दारव्हा ५, बाभुळगाव २, कळंब १ आणि इतर ठिकाणचे २ रुग्ण आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना चा वाढता संसर्ग लक्षात घेता शासन आणि प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासना कडून करण्यात आले आहे.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने