Breaking

Post Top Ad

गुरुवार, २५ मार्च, २०२१

कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनात समन्वय:जिल्हाधिकारी सिंह

कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनात समन्वय:जिल्हाधिकारी सिंह
यवतमाळ:संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या 'कोरोना'या जागतिक संकटाशी दोन हात करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाची असून त्या करिता कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यासोबत समन्वय असल्याची माहिती खुद जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी आयोजित पत्रकार परिषेदेत दिली.


कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्याची सध्यास्थितीच्या विषयावर माहिती देण्यासाठी आज दि.२५ मार्च रोजी दुपारी दरम्यान 'गार्डन हॉल' येथे जिल्हाधिकारी सिंह यांनी पत्रकार परिषद बोलावली होती.दरम्यान यावेळी,पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील,प्रमोदसिंह दुबे आणि डॉ.मिलिंद कांबळे,उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, तरंग तुषावारे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन कोरोनावर मात करण्याचा निर्धार व्यक्त करून दाखवला.


"प्रशासनात समन्वय": पोलीस अधिक्षक पाटील 

जिल्हा प्रशासन मध्ये जिल्हाधिकारी हा कुटूंब प्रमुख च्या भूमिकेत असतांना एकादा अधिकारी कामात चुकत असेल तर जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील नागरिकांच्या हितासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली चुक त्यांच्या लक्षात आणुन देतात.त्यामागे जिल्हाधिकारी यांचा व्यतिगत कोणतेही कारण नसते.आम्ही प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांमध्ये कोरोना या संकटा सोबत लढण्यासाठी समन्वय असल्याची माहिती पोलीस अधिक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांनी दिली .


दरम्यान यावेळी संयुक्त पत्रकार परिषेदेत बोलताना जिल्हाधिकारी सिंह म्हणाले कि,जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या १९ टक्के पर्यंत होती.सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग झपाट्याने सुरु केल्याने जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी १९ वरून ८ टक्केवर आली असून ती लवकरच ५ टक्यावर आणण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.जिल्ह्यातील वाढत्या  रुग्णांची संख्या लक्षात घेता याबाबत प्रशासनात योग्य समन्वय साधत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा जिल्हा पोलीस अधीक्षक,डाॅ. यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये कोरोनावर  मात करून जिल्ह्याला कोरोना मुक्त करण्याचा जणू काही सर्व अधिकाऱ्यांनी संकल्प केल्याचे चित्र यावेळीं दिसून आला 

कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनात समन्वय:जिल्हाधिकारी सिंह

जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना म्हणाले कि, जिल्हाधिकारी हे आमचे कुटूंब प्रमुख,मार्गदर्शक असल्याने त्यांनी काही दिवसाआधी जिल्ह्याच्या कामात सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी आयुक्तांना  मासिक आवाहल पाठविला त्यामुळे प्रशासनात समन्वय नाही का अशीं चर्चा सुरु होती.मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी हे आमचे कुटुंब प्रमुख असल्याचे सांगून सुरु असलेल्या चर्चेची हवाच काढून टाकल्याने सर्व अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे  असल्याचे भुजबळ पाटील यांनी बोलून दाखविले 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad