Breaking

Post Top Ad

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

दिलासा: ५४८ जणांना सुट्टी ४८ तासात ३५४ पॉझिटीव्ह रुग्ण

 


दिलासा: ५४८ जणांना सुट्टी ४८ तासात ३५४ पॉझिटीव्ह रुग्ण
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ५४८ जण गत दोन दिवसांत बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यात गुरुवारी ११४ जण तर शुक्रवारी ४३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच गत ४८ तासात जिल्ह्यात एकूण १७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून पहिल्या चोवीस  तासात सात जण तर दुसऱ्या २४ तासात १० जणांचा समावेश आहे. तसेच दोन्ही दिवसात जिल्ह्यात एकूण ३५४ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली. 

मृत झालेल्या सात जणांमध्ये यवतमाळ शहरातील नवजात बालक, ५२ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय पुरूष, ६० वर्षीय महिला, तालुक्यातील ६५ वर्षीय पुरूष, आर्णी शहरातील ६० वर्षीय पुरुष आणि पुसद शहरातील ६५ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. तर दुसऱ्या  २४ तासात मृत झालेल्या १० जणांमध्ये यवतमाळ शहरातील ३७ वर्षीय दोन पुरुष, ४८ वर्षीय, ६४ वर्षीय आणि तालुक्यातील ३७ वर्षीय पुरुष, झरी जामणी शहरातील ६० वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील ६४ वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील ५० वर्षीय पुरुष, पुसद शहरातील ५२ वर्षीय पुरुष आणि जिल्ह्यातील एका पुरुषाचा समावेश आहे. गत ४८ तासात जिल्ह्यात ३५४ जण नव्याने पॉझिटीव्ह आले असून यात २१५ पुरुष आणि १३९ महिला आहेत.


गत २४ तासात पॉझिटीव्ह आलेल्या १८२ जणांमध्ये ११४ पुरुष आणि ६८ महिला आहेत. यात आर्णी शहरातील दोन पुरुष, आर्णी तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, बाभुळगाव शहरातील पाच पुरुष व दोन महिला, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरुष व तीन महिला, दारव्हा शहरातील आठ पुरुष व चार महिला, दारव्हा तालुक्यातील एक महिला, दिग्रस शहरातील पाच पुरुष व दोन महिला, घाटंजी शहरातील नऊ पुरुष व तीन महिला, महागाव शहरातील तीन पुरुष व एक महिला, मंगरूळपीर शहरातील एक पुरुष, मारेगाव शहरातील एक पुरुष व तीन महिला, मारेगाव तालुक्यातील एक पुरुष, नेर शहरातील १० पुरुष व सहा महिला, नेर तालुक्यातील दोन महिला, पांढरकवडा शहरातील चार पुरुष व पाच महिला, पुसद शहरातील १५ पुरुष व दोन महिला, पुसद तालुक्यातील एक पुरुष, उमरखेड शहरातील सात पुरुष व आठ महिला, वणी शहरातील सात पुरुष व तीन महिला, वणी तालुक्यातील दोन पुरुष, यवतमाळ शहरातील ३१ पुरुष व २२ महिलांचा समावेश आहे.


वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात १२३४ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये ३८९ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ६७५४ झाली आहे. यापैकी ४९३९ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १८२ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात ३०३ जण भरती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ६५६८५ नमुने पाठविले असून यापैकी ६४५६५ प्राप्त तर ११२० अप्राप्त आहेत. तसेच ५७८११ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.


जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून पहिल्या अडीच महिन्यात जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला नव्हता. मात्र जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मृत्युच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. ही बाब गांभिर्याने घेऊन जिल्ह्यातील मृत्युदर कमी करण्यासाठी डॉक्टरांनी कसोशीने प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयातील नियेाजन सभागृहात कोव्हीड-१९ तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या विषयांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्स डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण आदी उपस्थित होते.


कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण अचानक का वाढले अशी विचारणा करून विभागीय आयुक्त म्हणाले, ज्या ठिकाणावरून जास्त पॉझेटिव्ह रुग्ण येत आहे, अशा शहरी व ग्रामीण भागात अत्यंत काटेकोरपणे सर्व्हेलंस वाढविणे गरजेचे आहे. अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयाने मृत्युवर चांगल्या प्रमाणात नियंत्रण आणले. त्याच धर्तीवर येथे सुध्दा डॉक्टरांनी प्रयत्न करावे. यासाठी राज्याच्या टास्क फोर्सशी नियमित संपर्कात राहावे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधितांवर उपचार करणा-या डॉक्टरांनी अकोला जीएमसीच्या डॉक्टरांसोबत चर्चा करावी.


जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्णांमागे त्यांच्या संपर्कातील हाय रिस्क व लो रिस्क कॉटॅक्ट शोधण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले याबाबत विभागीय आयुक्तांची नाराजी व्यक्त केली. संपर्कातील व्यक्ती शोधण्याचे हे प्रमाण यवतमाळ जिल्ह्यात १७ टक्क्यांपर्यंत गेले होते. आता मात्र ९.४२ टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घ्या. पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेल्या भागात सभोवतालची त्रिज्या ठरवून तो भाग प्रतिबंधित करून नागरिकांची तपासणी करावी, अशा सुचना त्यांनी केल्या. वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सीजनयुक्त बेडची संख्या किती. अतिरिक्त बेडबाबत काय नियोजन केले आहे. एका रुग्णाला २४ तासात किती ऑक्सीजन लागते. ऑक्सीजन सिलींडरचा पुरवठा नियमित होतो का. औषधांचा तुटवडा आहे काय, आदींबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच वाढीव कोव्हीड बेडसाठी आवश्यक डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी उपलब्ध करून घ्या. सफाई कर्मचा-यांबाबत एखादी एजंन्सी अधिग्रहीत करण्याचे नियोजन करा, अशा सुचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad