Breaking

Post Top Ad

सोमवार, ६ जुलै, २०२०

योगी महाराजांच्या उत्तर प्रदेशात चाललय काय?


योगी महाराजांच्या उत्तर प्रदेशात चाललय काय?उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात पोलीस हत्याकांडाने उत्तर प्रदेशातील 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' सरकारची पोलखोल केली आहे. या घटनेमुळे ४० वर्षानंतर उत्तर प्रदेशात पोलिसांना गुंडा अशापद्धतीने मारू शकत असतील तर योगी महाराजांच्या उत्तर प्रदेशात बदलला काय? असा सवाल शिवसेनेने सामना अग्रलेखाच्या माध्यमातून विचारला आहे.

विकास दुबे नेपाळमध्ये फरार होऊ शकतो असा संशय असल्याने उत्तर प्रदेश पोलिसांनी येथील सीमा सील वगैरे केल्याचा बातम्या समोर आल्या आहे. या पार्श्वभूमीवर विकास दुबे आपल्यासाठी 'नेपाळमधील दाऊद' ठरू नये म्हणजे मिळवले अशी भीती शिवसेनेने व्यक्त केली आहे. सध्या नागरिक कोरोना लोक डॉन मध्ये बंदिस्त आहे. गुंडा पासून सुरक्षित राहण्यासाठी लोक डॉन मध्ये राहावे लागेल का, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

'सामना'च्या अग्रलेखातील ठळक मुद्दे
कानपुर पोलीस हत्याकांडाने उत्तर प्रदेशातील एन्काउंटर स्पेशालिस्ट सरकारची पोलखोल केली आहे या हत्याकांडाने चाळीस वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातच झालेल्या नथुआपूर पोलीस हत्याकांडाच्या दुखत स्मूतींना उजाळा दिला आहे. चाळीस वर्षानंतर ही उत्तर प्रदेशात पोलिसांना गुंड अशापद्धतीने मारू शकत असतील तर योगी महाराजांच्या उत्तर प्रदेशात बदललेलं काय? आज जनता लाॅकडॉऊन मध्ये मध्ये  बंद आहे, उद्या गुंड पासून सुरक्षित राहण्यासाठी लाॅकडॉऊन मध्ये राहावे लागेल का, असा प्रश्न तेथील जनतेच्या मनात आहे. प्रश्न अनेक आहेत, त्याची उत्तरे योगी सरकारला द्यायची आहेत. कारण उत्तर प्रदेश म्हणजे उत्तम प्रदेश असे म्हटले जाते. उत्तम प्रदेश पोलिसांच्या रक्ताने भिजला. देशाला हा धक्का आहे!
दि. २ जुलै रोजी विकास दिव्याच्या गुंडांकडून आठ पोलिसांचे निर्गुण शिरकाण झाले, त्यामुळे देश हादरला आहे. या आठ पोलिसात पोलिस उपअधीक्षक दर्जाचा एक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कानपूर मधील चौबेपुर पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील बिकरू या गावात कुख्यात गुंड विकास दुबे याला पकडण्यासाठी पोलिस पथक गेले होते. मात्र दुबे आणि त्यांच्या गुंडांनी या पोलिस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये पोलीस उपअधीक्षक देवेंद्र मिश्रा यांच्यासह तीन पोलिस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल अशा आठ पोलिसांचा मृत्यू झाला.

"या हत्याकांडामुळे संतापलेल्या योगी सरकार ने दुसऱ्या दिवशी विकास दुबे चे आलिशान घर जेसीबी लावून जमीनदोस्त केले. म्हणजे विकास दुबे नाही मिळाला तर त्याचे घर उद्ध्वस्त केले. हे घर अनधिकृत होते असे सांगण्यात आले. अनधिकृत घर तोडले हे बरे झाले, पण'शहीद' पोलिसांच्या उद्ध्वस्त घरांचे काय? त्यामुळे त्यांच्या पत्नींना त्याचे 'सौभाग्य,' आई-वडिलांना मुलगा आणि मुलांना त्याचे वडील परत मिळणार आहेत का? हा प्रश्न केवळ उत्तर प्रदेशातील नागरिकांमध्ये नाहीतर देशातील नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad