Breaking

Post Top Ad

शनिवार, १० मे, २०२५

'पोलीस अधीक्षक कुमार चिंता ॲक्शन मोडवर'

'पोलीस अधीक्षक कुमार चिंता ॲक्शन मोडवर'
यवतमाळयवतमाळ शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारांची जंत्री पोलीस अधीक्षकांकडे आहे गल्लीबोळात जन्माला येणाऱ्या टोळीतील गुन्हेगारांची इत्थंभूत माहितीही आहे. मात्र गत काही महिन्यांपासून गुन्हेगारांवर वाचक निर्माण करू शकणारे अधिकारी व कर्मचारी अडगळीत गेले आहेत.आपल्याला काय करायचे अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. त्याचाच फायदा घेतला जात आहे.त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर रूप धारण करीत आहे. आशात जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सर्व गुन्हेगारांची जंत्री बाहेर काढण्याचे आदेश सर्व ठाणेदारांना दिल्याची माहिती आहे.

नव्वदच्या दशकात अतिशय शांत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यासह जिल्ह्यात गुन्हेगारीची चांगलीच फोफावली आहे. अगदी शिल्लक कारणातून रक्तपात घडविल्या जात आहे. आता तर खुन्नस काढण्यासाठी चक्का देशी कट्टा काढला जात आहे. ग्रामीण भागातील देशी कट्टे पोहोचले असताना पोलीस प्रशासनाकडून जप्तीची कारवाई केली जात आहे.

यवतमाळचे जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी काही दिवसांपासून ऑपरेशन प्रस्थान या मोहिमेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबविल्या गेली यात हजारो तरुण-तरुणींना रोजगार देण्यात पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि त्यांची टीम यशस्वी झाली. त्यानंतर तरुणींना दोन दिवसीय शिबिरात संरक्षणाचे शिक्षण दिले याच दरम्यान यूपीएससी बाजी मारणाऱ्या मुलांचं सत्कार करण्यात आले.दरम्यान नागरिक आणि पोलीस यांच्यात संपर्क ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील हजारो गावात क्रिकेट हॉलीबॉल कबड्डी यासारखे सामने घेऊन पोलीस आणि नागरिकांमध्ये संपर्क ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीस अधीक्षक चिंता यांनी मोहिम राबविली.
'पोलीस अधीक्षक कुमार चिंता ॲक्शन मोडवर'



जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांवर जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी लक्ष केंद्रित केल्याने गुन्हेगारांमध्ये देखील एक प्रकारचं दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा गुन्हेगारी वर्तुळात रंगत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात अट्टल गुन्हेगार आणि दोन समाजातील निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर बचत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कुमार चिंता यांनी संबंधित पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना गुन्हेगारांच्या कुंडल्या तपासून एमपीडीए आणि मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना दिले आहे त्यामुळे लवकरच जिल्ह्यातून अनेक जण तडीपार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गुन्हेगारी पार्श्वभूमीची लोकांची येत्या काही दिवसात जिल्हा पोलीस अधीक्षक शाळा भरणार असल्याची माहिती पोलीस वर्तुळातून समोर येत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad