Breaking

Post Top Ad

शुक्रवार, १९ जून, २०२०

`या अभिनेत्रींनी अजूनही केले नाही लग्नʼ

बाॅलिवूड मधिल अनेक अभिनेत्री आज ही लग्न केलेलं नाही, काही अभिनेत्री यांचा वय ५० वर्ष होऊन सुध्दा जोडीदार मिळालेला नाही. हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक चित्रपट हिट देवून करोडो चाहत्यांच्या मनात घर करून बसलेल्या अभिनेत्री लग्ना विनाच आहेत. दिसायला पण हटके असलेल्या अभिनेत्री आजही लग्न न करताच जिंवन जगताय, वयाच्या ५० व्या वर्षा नंतरही त्यांनी लग्न का केलं नाही? लग्नास कोणी होकार देत नाहीत का? अशा अनेक प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया.
चाहत्यांना भुरळ घालणारी तब्बू
हिंदी, तमिळ, मल्याळी आणि इग्रंजी चित्रपटात भूमिका करणारी तब्बू ऊर्फ तबस्सुम हाशमी हिचा जन्म दि.४ नोव्हेंबर १९७० रोजी झाला. तब्बू ५० वर्षांची झाली आहे. "हम साथ साथ है" या चित्रपटात चांगली भूमिका साकारली. चांदणी बार, दुश्यम, हक्कीगत, प्रेम, हिम्मत, हेरा फेरी, जय हो, विजयपथ आदी चित्रपटातून तिने अभिनय केलं आहेत. मात्र अद्यापही तब्बूने लग्न केलेले नाही.
सौदर्यांची खाण सुष्मिता सेन
सुष्मिता सेन हि बाॅलिवूड मधिल शानदार अभिनेत्री म्हणुन तिची ओळख आहेत. १९९४ साली मिस युनिव्हर्स सौदर्य स्पर्धेत तिने 'मिस युनिव्हर्स' किताब पटकावला विशेष म्हणजे किताब पटकावणारी सुष्मिता हि पहिलीच भारतीय स्त्री ठरली आहेत. १९९६ साली दस्तक या हिंदी चित्रपटातून बाॅलिवूड मध्ये एण्ट्री केली. त्या नंतर रत्चगन, जोर, सिर्फ तुम, हिंदुस्तान की कसम, आगाज, क्योंकि मै झूठ नहीं बोलता, ऑखे आदी चित्रपटात तिने अभिनय केले आहेत. सुष्मिता ही ४५ वर्षाची असून तिने दोन मुली दत्तक घेतले आहेत.सुष्मिता लग्न कधी करेल याबाबत तिने कधीही जाहीरपणे बोलले नाही.
 कहो ना प्यार है..अमीषा 
अमीषा पेटल हिचा जन्म ९ जून १९७६ साली मुंबईत झाला. अमेरिकेच्या बाॅस्टन शहरांमधील टफ्टस विद्यापीठातून पदवी घेतल्या नंतर २००० साली रिलीज झालेल्या कहो ना प्यार है या चित्रपटात ॠतिक रोशन ची नायकेची भूमिका करून बाॅलिवूड मध्ये पदार्पण केले. अमीषा ४४ वर्षाची झाली असून लग्नाच्या प्रतीक्षेत आहे. गदर: एक प्रेम कथा, हमराज, रेस, आप मुझे अच्छे लगने लगे, हमको तुमसे प्यार है, भुलै भुलैया, क्या यही प्यार है आदी चित्रपटात तिने अभिनय केले आहे.

1 टिप्पणी:

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad