बंजारा समाजाच्या तांड्याला सोईसुविधा आणि महसुली दर्जा देण्यात यावा तसेच महसुली दर्जा देण्यास विलंब लागत असेल तर तांड्याला विशेष निधी सरकार ने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाजप आमदार अॅड. निलय नाईक यांनी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सभागहात केली.
भाजप आमदार अॅड. निलय नाईक यांनी विधान परिषद मध्ये सरकारचे विशेष लक्षवेधले दरम्यान यावेळी निलय नाईक यांनी बंजारा समाजाच्या तांड्याला महसुली दर्जा त्वरीत देण्यात यावा आणि दर्जा देण्यास विलंब होत असेल तर विशेष निधी देण्याची मागणी नाईक यांनी केली.बंजारा समाजातील मुला-मुलींना शिक्षणासाठी वस्तीगृह ची व्यवस्था सरकाने करून द्यावा.
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक महामंडळ ला विशेष दर्जा देऊन निधी उपलब्ध करून देण्यात यावे.दरम्यान नाईक यांनी सरकारचे लक्षवेधले असताना आरक्षणावर भाष्य करताना म्हटले की,मराठा,धनगर आरक्षणाला आमचा पांठीबा असून आमच्या मागण्या त्वरीत न सोडविल्यास बंजारा समाज रस्त्यावर उतरल्या शिवार गप्प बसणार नसल्याचा इशारा यावेळी निलय नाईक यांनी सरकारला दिला.
